madhyaseema.blogspot.com
कविता ‘कवी’चं नाव सोबत बाळगत असली तरी लिहून
हातावेगळी झाल्यावर ती एका खोल अर्थानं कवीची राहात नाही.. फार काय ती त्यातल्या
शब्दांचीही राहात नाही. कवी-मनातून बाहेर पडून शब्दांच्या रंगमंचावर कविता एकदा
सादर झाली आणि पडदा पडला की पडलाच..! तिची नाळ तुटते. ती स्व-तंत्र होते. मुक्त
होते कवीनं दिलेल्या आकारातून. रसिकवाचक जेव्हा त्या कवितेचा आस्वाद घेतो तेव्हा
ती पुन्हा साकारते रसिक-मनात. तो तिचा नवा जन्म असतो!
उत्तरार्धानंतरच्या
कविता..
उत्तरार्धानंतरच्या या कविता
‘व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर’
या नावानं संग्रहरूपात प्रकाशित झाल्या आहेत.
प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी.
प्रकाशन तिथी- मे २०१६.
उत्तरार्धानंतरच्या या कविता
‘व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर’
या नावानं संग्रहरूपात प्रकाशित झाल्या आहेत.
प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी.
प्रकाशन तिथी- मे २०१६.
भूमिका-
कवितेचे हे जन्म..
विलय.. नवे जन्म म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ..! ती या
जगड्व्याळात असतेही आणि नसतेही. व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर अवचित कधीतरी
कवीला दिसते आणि शब्दात प्रकाशित झाल्यावर रसिकालाही दिसू लागते..! मला दिसलेल्या
काही कविता इथे सादर करतेय रसिकमनात पुन्हा जिवंत व्हाव्यात म्हणून, प्रतिसादाच्या अपेक्षेत..!
No comments:
Post a Comment